
मनाच्या अंतरंगात कोकाटणाऱ्या शेकडो, हजारो, असंख्य प्रश्नांना आपल्याला उत्तर देता येतातच असं नसतं. मुळात काही प्रश्न ही फक्त प्रश्नच असतात. त्या प्रश्नांमध्येच उत्तर न मिळण्याचं गुढं लपलेल असत. म्हणुनच त्याची उत्तरं न शोधण चांगलं. पण, आपला मनुष्यस्वभाव जे मिळत नाही ते मिळविण्याचा, जे दिसत नाही ते पाहण्याचा, जे नाही ते भासवण्याचा... आणि मग नसलेलं भासवण्याच्या प्रयत्नात आपल्यासमोर असलेलं दिसेनासं व्हायला होतं. जे वास्तव आहे त्याचाही विसर पडतो. परंतु त्या वास्तवाचं असण नाकारता येणार नाही, जे नाही त्या मृगजळामागे धावण्यापेक्षा, जे आहे त्या वास्तवात अधिक काहीतरी शिकण्यासारखं, वाचण्यासारखं, अनुभवण्यासारखं असतं. जगातल ते वास्तव कुणाच ठावून कुठे गुडूप होऊन बसलयं ते ? पण माझं मला माहित आहे...मी.. मी... आणि फक्त मीच......
